ज्यांना भारत अविकसित, अनएमप्लॉयी वाटत होता ते फुकटच्या विमानाने देशात येत आहेत आणि
जे देशाचे सच्चे निर्माण कर्ते आहेत ते शेकडो किलोमीटर पायी आपल्या गावी जात आहेत.
गरीब मजूर अन्न पाण्याविना जीव गमावत आहेत तर बड्या उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे माफ होत आहेत
#कोरोनामुळे प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात इमारत उभी करताना पाया मध्ये घातलेल्या दगडांकडे नंतर कोणाचेच लक्ष जात नाही किंवा त्याची कोणी दागडुजीही करत नाही वरच्या भिंती आणि इतर सर्वाना मात्र सारखी रंगरंगोटी व संरक्षण दिले जात असते
ज्यांच्या जीवावर, घामावर , उन्हातान्हातील कष्टावर सगळं साम्राज्य उभं राहत असा एखादा वर्गपण असेल आणि तो एव्हढ्या मोठ्या संख्येने असेल याची आजपर्यंत कित्येकांना जाणीव सुद्धा नव्हती
काम बंद पैसा बंद अशावेळी मरणाची पदोपदी भीती आणि मिळणारी शासकीय जेवणे यापेक्षा आपल्या घराकडे असणाऱ्या आपुलकीच्या जिवाभावाच्या माणसात जाऊन उपाशी मारायला तयार झाले तर नवल कसले.....
ज्यांच्या रक्ताच पाणी करून सर्वांची भविष्ये फुलतात त्यांना भविष्यच नाही मग एव्हढी माफक अपक्षा का ठेवू नये आणि ती ही तुमच्या कोणत्याही गाड़ी विमाना शिवाय
उद्या सर्व काही सुरळीत झाल्यावर पुन्हा यांचा वापर होणार असाच विना भविष्य विना स्वप्न आणि अदृश्य संख्येसह.......
सत्य परिस्थिती मांडली आहे सर.देशातील श्रीमंत लोकांनी गरीब लोकांना रस्त्यावरती आणले आहे.
ReplyDelete